मुंबई : महान्यूज लाईव्ह
ओरिसाचे वाहतुक विभागाचे सचीव अरुण बोत्रा यांना जयपूर विमानतळावर रोखले गेले, आणि त्यांना त्यांच्या हातात असलेली बॅग उघडण्यास सांगण्यात आले. त्यांनी जेव्हा बॅग उघडली तेव्हा विमानतळ सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाच व त्यांची बॅग बघण्यासाठी आणखीही बघ्यांची गर्दी गोळा झाली. अरुण बोत्रा यांनी त्यांच्या व्टिटर अकाऊंटवरून या घटनेचा तपशील दिला आहे. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत ७१ हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.
‘ जयपूर विमानतळावर जेव्हा मी बॅग उघडली तेव्हा ती बॅग ‘ हिरव्या मटाराच्या ताज्या शेंगानी ‘ भरलेली होती. बॅगेत हिरव्या मटाराच्या शेंगा पाहून विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. ‘ असे बोत्रा यांनी व्टिटरवर म्हणले आहे.
मी या शेंगा ४० रुपये किलो दराने विकत घेतलेल्या होत्या असेही बोत्रा यांनी म्हणले आहे.
बोत्रांच्या व्टिटवर अनेक वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अविनाश शर्मा या आएएस अधिकाऱ्याने स्वत:चा विमानप्रवासात भाजीपाला घेऊन जाण्यासाठी दिलेल्या २००० रुपये दंडाची आठवण सांगितली आहे.
एकाने यावर ‘ मटार स्मगलिंग ‘ अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
पवन डारुनी यांनी मीदेखील जयपूरमध्ये १० किलो मटार ४० रुपये किमतीने खरेदी केल्याचे म्हणले आहे.
ही घटना खरोखरच घडली होती की नाही, याबाबत जयपूर विमानतळाने काही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण बोत्रा यांनी व्टिटरवर याची काही छायाचित्रे टाकलेली आहेत. त्यावरून लोक या घटनेची मजा घेत आहेत.