राज्यमंत्री भरणे यांची लबाडी जनता सहन करणार नाही.. पाटील यांनी केला भरणेंवर केला पुन्हा हल्ला..
सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भाजपने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशामुळे इंदापुरातही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद दिसून आला. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरच्या निवासस्थानी इंदापूर येथे काल सायंकाळी विजयाचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला गेला. आता राज्यातही परिवर्तन अटळ असून इथल्या राज्यमंत्र्यांची लबाडी, फसवणूक आता इंदापूरची जनता सहन करणार नाही. यामुळे इंदापुरातही परिवर्तन होणार असल्याचा आत्मविश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पाटील म्हणाले की, म्हणाले, संपूर्ण भारत देश भाजपमय झाला आहे. देशातील विरोधक म्हणत होते, आता देशात बदल घडणार, मात्र मजबूत बहुमत देऊन जनतेने भाजपकडे सत्ता सोपविली आहे. आता महाराष्ट्रात व इंदापूरातही परिवर्तन घडणार आहे. इथल्या राज्यमंत्र्यांची लबाडी, फसवणूक आता जनता सहन करणार नाही. शेतकर्यांच्या वीज जोडणी साठी तात्काळ निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
भाजपच्या नेत्रदीपक विजयाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती वनवे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. तर गुलाल उधळण करत भाजपचे झेंडे फडकावत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयी सभेला इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार अतुल तेरखेडकर यांनी मानले.