• Contact us
  • About us
Saturday, May 21, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रविवारचा लेख – मिरचीने दिला भारतीय व्यापाराला झटका ! मिरची नेमकी कुणाची ?

tdadmin by tdadmin
March 6, 2022
in संपादकीय, शेती शिवार, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
top view of dried chillies on white background

Photo by ANTONI SHKRABA on Pexels.com

घनश्याम केळकर

तिखट लवंगी मिरची कोल्हापूरची म्हणून प्रसिद्ध आहे. पण देशात जागोजागी मिरचीच्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत. मिरची आपल्या जीभेवर, पोटात आणि स्वयंपाकघरात इतकी आता रुळली आहे, की याच मिरचीने ऐकेकाळी भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा झटका दिला होता, हे आपण साफ विसरून गेलो आहोत. मिरचीच्या झटक्याशिवाय भारतीय जेवणाचे ताट अपूरे आहे, पण ही मिरची मूळची भारतीय नाही, हे आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. ५००० वर्षांच्या इतिहास असलेल्या भारतात मिरची अवघ्या ५०० वर्षापूर्वी आलेली आहे. तिने इथे आल्यावर स्वयंपाकघरातून काळ्या मिरीला जवळपास हुसकावून लागले आहे.

मिरचीने काळ्या मिरीला केवळ आपल्या स्वयंपाकघरातून हुसकावले नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारातून हुसकावले. त्याची फार मोठी झळ जगाच्या व्यापारातील भारताच्या महत्वाला बसली. अशा या तिखट मिरचीची करामत आज आपण बघणार आहोत, आजच्या रविवारच्या लेखात…….

भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास खुप प्राचीन आहे. या व्यापारातील एक मुख्य घटक म्हणजे काळी मिरी. जगभरात जेवणाला तिखटपणा आणणारा एकच पदार्थ होता तो म्हणजे काळी मिरी. याच्याच जोडीला आल्याचाही वापर होई, पण काळी मिरीला पर्याय नव्हता.

ही काळ्या मिरीचे उत्पादन केवळ भारतातील मलबारच्या म्हणजे आजच्या केरळमध्ये होत असे. या काळ्या मिरीशिवाय युरोपातील श्रीमंताना जेवण जात नसे. या काळ्या मिरीसाठी जगभरातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावर येत असत. काळ्या मिरीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन आणि पोर्तृगाल या त्यावेळच्या महासत्तांमध्ये मोठी युद्धे लढली गेली. केरळमधून अरबस्थानात आणि तेथून युरोपमध्ये हा व्यापार होत असे. पण अरबस्थानात इस्लामचा उदय झाला. त्यानंतर साधारणत: १४ व्या शतकात ऑटोमन साम्राज्याने इस्तंबूलचा ताबा घेतला आणि हा व्यापार बंद पडला. अर्थातच काळी मिरी युरोपला मिळेनाशी झाली.

यानंतर भारताकडे जाण्याचे इतर मार्ग शोधायला युरोपातील राष्ट्रांनी सुरवात केली. यातले दोन जण आपल्याला चांगले माहिती आहेत. एक भारतापर्यंत पोचलेला वास्को दी गामा. आणि दुसरा वाट चुकून अमेरिकेला पोचलेला कोलंबस. वास्को दी गामाने भारतात पोचून काळी मिरीचा व्यापार पुर्ववत करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे कोलंबस भारताऐवजी अमेरिकेला पोचला. तिथे त्याला भारताऐवजी अमेरिका सापडली आणि काळ्या मिरीऐवजी सापडली मिरची.

तर मिरची ही मुळची मेक्सिकन म्हणजे दक्षिण अमेरिकन आहे. कोलंबसने तिचा तिखट गुण पाहून तिला काळ्या मिरीच्या जोडीचे नाव दिले. कोलंबसबरोबर मिरची स्पेन आणि पोर्तुगालमध्ये आली. पोर्तृगालमधून ती भारतात आली. भारतातून आफ्रिकेत पोचली. आफ्रिकेतील गुलामांसोबत ती उत्तर अमेरिकेत पोचली. तिच्या तिखट गुणांमुळे आणि उत्पादन घेण्याच्या सहजतेने तिला जगभर झपाट्याने प्रसिद्धी मिळाली.

आणि अर्थातच काळ्या मिरीला पर्याय निर्माण झाला. काळी मिरी मुळातच महाग होती. त्यामुळे गरिबांच्या घरात तिला प्रवेशच मिळत नव्हता. आता मिरचीने तिथे प्रवेश केला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे काळ्या मिरीवर युरोपचे अवलंबून राहणे कमी झाले. अर्थातच भारताचा आंतराराष्ट्रीय व्यापारातील वाटा घटला. दुसरीकडे याच काळ्या मिरीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वास्को दी गामा भारतात पोचला होता. त्याने काळ्या मिरीचा व्यापार आपल्या नियंत्रणाखाली आणला. पण त्याला तिथे काळ्या मिरीखेरीज अनेक वस्तू व्यापारासाठी मिळाल्या.

हळूहळू काळी मिरी मागे पडली, पण भारताकडे येण्याचे मार्ग युरोपीयन देशांना खुले झाले. त्याचाच परिणाम पुढे भारतावर इंग्रजांचे राज्य येण्यात झाला.

आज मिरची ही भारतातील जवळपास सगळ्या राज्यात पिकविली जाते. भारतातील जवळपास १०० टक्के घरातील स्वयंपाकघरात मिरची पुड असल्याशिवाय स्वयंपाक पुर्ण होत नाही. आज ही मिरचीला परदेशी म्हणण्याची कोणाची टाप नाही. पण याच मिरचीने भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा धक्का दिला हे मात्र याच मिरचीइतके तिखट सत्य आहे.

Previous Post

मुलांनो आनंदाने परीक्षेला सामोरे जा..!

Next Post

बेकायदा गावठी पिस्तूल प्रकरणी पुन्हा एकास यवत पोलिसांनी केली अटक ! एवढा मोठा शस्त्रसाठा कशासाठी ? दौंड तालुक्यात गुन्हेगारी टोळी पुन्हा सक्रिय ?

Next Post
बेकायदा गावठी पिस्तूल प्रकरणी पुन्हा एकास यवत पोलिसांनी केली अटक ! एवढा मोठा शस्त्रसाठा कशासाठी ? दौंड तालुक्यात गुन्हेगारी टोळी पुन्हा सक्रिय ?

बेकायदा गावठी पिस्तूल प्रकरणी पुन्हा एकास यवत पोलिसांनी केली अटक ! एवढा मोठा शस्त्रसाठा कशासाठी ? दौंड तालुक्यात गुन्हेगारी टोळी पुन्हा सक्रिय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

coffee apple iphone smartphone

आता याची चोरी होते ! १४ कोटीचा डेटा चोरीला गेला !

May 21, 2022
शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

May 20, 2022
वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

वाई पोलिसांनी आरोपीसह ८५ हजारांच्या ४ दुचाकी केल्या जप्त !

May 20, 2022

बारामतीसह राज्यातील करिअर अकॅडमींच्या नफेखोरीचा बाजार उठणार? भरमसाठ शुल्कातून पालकांची सुटका होणार? राज्य शासनाने घेतली गंभीर दखल!

May 20, 2022

चक्क ‘बारामती’तून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना आंबे पाठवले..! भसाळे यांचं निर्यातीचं ‘इंद्रधनुष्य’! महाराष्ट्रासह ‘बारामती’चा अमेरिकेत रोवला झेंडा..!

May 20, 2022

दुर्दैवी : पाहुण्याच्या गावात आलेल्या पाच जणी भाटघर धरणात बुडाल्या..! तिघींचे मृतदेह सापडले!

May 19, 2022

मुळशीमध्ये अविनाश बलकवडे यांनी आयोजित केला ‘धर्मवीर’ चा मोफत शो!

May 19, 2022

देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) इंदापुरात! नीरा नरसिंहपूरचा करणार दौरा!

May 19, 2022

मळद दरोड्यातील फरार अट्टल दरोडेखोरास यवत पोलीसांनी केले जेरबंद!

May 19, 2022
मतदानासाठी गावी निघालेल्या जोडप्याचा अपघात; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर..

बारामतीत एमआयडीसीतील कंपनीत एका कामगाराचा मृत्यू ! डोक्यात लोखंडी रॉड पडला !

May 19, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group