वाई : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याती विरमाडे येथे शिवारात वीजेच्या तारांमुळे शॉकसर्किट होऊन अडीच एकर ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
३ मार्च रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत विशाल अशोक सोनावणे आणी लगत असणारे पंडीत दत्तात्रय सोनावणे या दोघांचेही तोडण्यासाठी आलेले ऊसाचे ऊभे पीक जळून खाक झाले आहे.
या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने विरमाडे गावात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे . या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे .
शेतकऱ्यांचे अंदाजे २०० टन ऊसाचे क्षेत्र जळुन खाक झाले आहे त्याच बरोबर ऊसाचे क्षेत्र भिजविण्यासाठी केलेली ठिबक सिंचन पाईप लाईन जळुन खाक झाली आहे असे मिळुन एकुण ३ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार ऊसाचे मालक असलेले विशाल अशोक सोनावणे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यात त्यांनी जळीत झालेल्या ऊसाची सखोल चौकशीची मागणी केली आहे