महान्यूज लाईव्ह विशेष
सोशल मिडिया आणि इतर सर्व माध्यमावरून आपल्या सोयीच्या बातम्या पसरविण्याची प्रंचड ताकद असलेल्या भाजपाच्या यंत्रणेने युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आपण कसे भारतात आणले याचे ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे विमानतळावर विद्यार्थ्यांना फुले देणाऱ्या मंत्र्यांवर विद्यार्थी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कू वर एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थी नदीच्या तटावर उभे आहेत. मोदीच्या दोन्ही तीरापर्यंत पसरलेल्या हातांवरून ते ही नदी पार करत असताना दिसत आहेत. इतर देशांच्या विद्यार्थ्यांना मात्र वाचवायला कोणीच नाही. ते तिथेच अडकले आहेत, असे या व्यंगचित्रात दिसते आहे. एकुणच मोदींनी कशी भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली, याचे गुणगान भाजपाच्या मिडिया सेलने गायला सुरुवात केली आहे. हा मुद्दा उत्तर प्रदेशच्या उरलेल्या निवडणुकीतही भाजपा जोरदारपणे वापरताना दिसते मात्र दिसते आहे.
मात्र दुसरीकडे युक्रेनमधून परत येणारे विद्यार्थी मात्र सरकारवर नाराज असलेले दिसत आहे. आम्ही आमच्या सर्वाच्या प्रयत्नाने युक्रेनमधून बाहेर पडलो. त्यासाठी केंद्रसरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शुन्य डिग्रीपेक्षा कमी तापमानात अनेक दिवस काढले, बंकरमध्ये राहून अनेक दिवस काढले, सीमेपर्यंत जाण्यासाठी भरमसाठ पैसे देऊन वाहनाची व्यवस्था केली. दहा, वीस किलोमीटर पायी चालले. सीमेवर दिवस दिवस वाट पाहिली. या सगळ्यात केंद्रसरकार अजिबात मदतीला आले नाही. मात्र स्वत:च्या ताकदीवर सीमा ओलांडल्यानंतर केंद्र सरकारने विमानाची सोय केली, जी सोय विद्यार्थ्यांना दुसरीकडूनही उपलब्ध झाली असती.
आता ज्यावेळी विद्यार्थी भारतीय विमानतळावर येत आहेत, त्यावेळी केंद्रीय मंत्री त्यांना गुलाबाची फुले द्यायला उभे राहिले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी राग व्यक्त करत आहेत.
‘येथे आल्यानंतर दिली जात असलेल्या या फुलांचे करु तरी काय ? ‘ या शब्दात दिव्यांशू सिंग या विद्यार्थ्याने आपला राग व्यक्त केला.
अनेक विद्यार्थीही अशाच प्रकारे आपला राग व्यक्त करत आहेत. पण आपल्या चुकांनाही प्रचंड प्रसार माध्यमांच्या आधारे आपला विजय असल्याचे भासविणाऱ्या भाजपाच्या यंत्रणेपुढे हे विद्यार्थीही हतबल ठरत आहेत.
आज भारतातील कितीतरी मध्यम वर्गीय कुटुंबे आहेत.ज्यांचा वार्षिक उत्पन्न जेमतेम 8ते9लाख रुपयांच्या
दरम्यान आहे.वाढत्या महागाईमुळे यामध्ये कुटुंबाचा चरितार्थ चालवला जातो, कुटुंबातील मुलांचे शिक्षण आजारपण हे सर्व चालू असते.अशात घरातील एक दोन मुले मेडिकलसाठी सेमी गव्हर्नमेंट काॅलेजला गेली असल्यास त्यांना फ्रिशिप स्काॅलरशिपमुळे शिक्षण घेता येते परंतु मोदी सरकारने गेल्या चार वर्षांपासून 8लाखाच्या पुढे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवली नाही; त्यामुळे कितीतरी मध्यम वर्गीय कुटुंबांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8-9लाखाचे दरम्यान आहे त्यांना घरदार विकायची पाळी आली आहे.त्यांनी जगावे की मुलांची 10-11लाख रू.फी भागवायची?