महान्यूज सोशल मिडिया टीम
आपल्या देशात देशाच्या लोकसंख्येपेक्षा मोबाईल फोनची संख्या जास्त आहे. त्यातही एका मोबाईलमध्ये दोन तीन सीम असतात. परंतू आता मात्र यावर मर्यादा येणार आहेत. मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन तुम्ही घेऊ शकणार नाही.
दूरसंचार विभागाने काल मोबाईल सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. नव्या आदेशानूसार एक व्यक्ती जास्तीत जास्त ९ मोबाईल सिम वापरू शकते. जम्मु – काश्मीर, ईशान्येकडील राज्यात तर ही मर्यादा ६ सीमवरच आणण्यात आलेली आहे.
वाढते आर्थिक गुन्हे, वेगवेगळे सीमवरून कॉल करून फसवणूक करणारांची वाढती संख्या, सायबर गुन्हेगारी सारख्या कामांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे.
या आदेशानूसार वापरात नसलेल्या नंबरवरील आऊटओईंग सेवा ३० दिवसात तर इनकमिंग सेवा ४५ दिवसात बंद केले जातील.
ग्राहकाने स्वत:हून असे मोबाईल क्रमांक बंद केले नाहीत तर, ते ६० दिवसात आपोआप बंद होतील. आंतरराष्ट्रीय रोमींगवर असलेल्या ग्राहकाला अतिरिक्त ३० दिवस मिळू शकतात, असे या आदेशात म्हणले आहे.