सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शेतकरी एकजुटीचा विजय असो! महावितरणच्या अधिकाऱ्यांच करायचं काय?.. शेतकऱ्यांची वीजजोड केलीच पाहिजे! महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध असो!! अशा घोषणांनी इंदापूर वीज वितरण कंपनीचा परिसर दणाणून गेला…वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर आंदोलकांची चर्चा फिस्कटली.आंदोलकांच्या भावनांचा झाला उद्रेक पहावयास मिळाला.अखेर आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दारातच ठिय्या मांडला.
हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दहा वाजल्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज संध्याकाळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता म्हसू मिसाळ तसेच त्यांचे सहकारी सूर्यवंशी इंदापूरचे अधिकारी गोठणे साहेब यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील व आंदोलकांची झालेली चर्चा फिसकटली.
चर्चेमध्ये वीज वितरण कंपनीच्या धोरणांवर हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी आपल्याशी फोन वरून चर्चा करून वेगळी चर्चा केली तर आता चर्चेसाठी पाठवलेले अधिकारी दुसरेच बोलत आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या मध्ये विसंगती दिसून येत असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी संताप व्यक्त केला.
वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घुमजाव करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आणि.
वीज वितरण कंपनीच्या विरोधात नाराजी व्यक्त होत सर्व कार्यकर्त्यांनी वीज वितरणच्या गेटच्या आत मध्ये कार्यालयाच्या दारातच आपला ठिय्या मांडला..
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील हे उपस्थित होते. या वेळी ठिय्या आंदोलनास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, विलासराव वाघमोडे, बाबासाहेब चवरे, शरद जामदार तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत..