आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत भिगवण येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाने इंदापूर तालुका विधी सेवा व समिती तसेच इंदापूर वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत भिगवण येथे रविवारी हे शिबिर संपन्न झाले.
कायद्याचे ज्ञान तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचणे काळाची गरज असून जोपर्यंत कायद्याचे ज्ञान असणारालाच साक्षर समजले पाहिजे असे मत या शिबिरात बोलताना इंदापूरच्या सहदिवाणी न्यायाधिश एस.डी.वडगावकर यांनी व्यक्त केले.
इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रमोद खरात, अॅड. स्वाती गिरंजे, अॅड. दिलीप गिरंजे, अॅड. मधुकर ताटे, अॅड. माधव शितोळे, अॅड. स्वप्नील जगताप, अॅड. विशाल मल्लाव, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच शितलताई शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस खजिनदार सचीन बोगावत, अभिमन्यु खटके, खंडेराव गाडे, राहुल गाडे, अमितकुमार वाघ, सत्यवान भोसले, अप्पा पवार, जयदीप जाधव आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.
अॅड. रवींद्रराजे निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित पुनर्वसित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या विविध प्रश्नांचे समाधानही केले . प्रास्ताविक अॅड. प्रमोद खरात, अॅड. पांडुरंग जगताप यांनी केले तर आभार अॅड. शिवाजी नगरे यांनी मानले.