दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : येथील एसटी स्टँड ते किसनवीर महाविद्यालयात
पोहचेपर्यंत पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी घेऊन दिलेल्या मोबाईलचा अनावश्यकपणे वापर होत असल्याचे पोलिसांच्या सर्वेक्षणात दिसुन येत आहे वास्तविक पाहता आपणास महाविद्यालयात आई वडिलांनी दिवसभर ऊन्हातान्हात कष्टाचे ओझे उचलून आपली मुलगी उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारी झाली पाहिजे, या अपेक्षा उराशी बाळगून शिक्षणासाठी पाठविले आहे.
याचे भान मुली विसरून दुर्दैवाने त्या सतत मोबाईलवर बोलताना आढळून येतात. अशा वेळी कुणी भामटा या संधीचा गैर फायदा घेऊन तो मुलींच्या हातातुन मोबाईल हिसकावून पोबारा करतो. याच्या अनेक तक्रारी वाई पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
असे प्रकार घडु नयेत यासाठी आज (दि.२७) रोजी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे आणि महिला दक्षता समितीने वाई एसटी स्टँड ते किसनवीर महाविद्यालयापर्यंत पायी चालत शेकडो विद्यार्थीनींना थांबवून मोबाईलचे तोटे व त्याचा वापर का करु नये याचे मार्गदर्शन केले ..
या आवाहनाला विद्यार्थीनींनी प्रतीसाद दिल्याने
पोलिस पथक आणि महिला दक्षता समितीने
समाधान व्यक्त केले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य इ. बी. भालेराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी महाविद्यालयात आणि परिसरात मुलींच्या होणाऱ्या छेडछाडीची प्रकरणे थांबविण्यासाठी उपाय सांगितला.
महाविद्यालयात मोबाईल वापरावर बंदी घालावी, त्याचबरोबर विना परवाना वाहन चालक विद्यार्थ्यांना समज द्यावी. ड्रिपलसीट बंदी घालावी. नंबर प्लेट नसणारे आणि फेन्सी नंबरप्लेट असणारी वाहने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करावीत. अशी मते मांडुन प्राचार्यांकडून सहकार्याची अपेक्षा या वेळी बोलताना व्यक्त केली .