राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा सोमवारी वाजली आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यात 197 पैकी 191 खाजगी तसेच जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थांचे गुलाब पुष्प देवून जंगी स्वागत करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी ४ ऑक्टोबरपासून कोरोनाचे नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. दौंड तालुक्यातील शासकीय, खासगी तसेच जिल्हा परिषद शाळांचे वर्ग सुरू झाल्या आहेत.
तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा 196 यापैकी 191 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर 3 शाळा बंद आहेत. तालुक्यातील 197 शाळांमध्ये एकुण 44 हजार 670 विद्यार्थींनी पहिल्या दिवशी हजेरी लावली, तर 10 हजार 234 विद्यार्थांनी शाळेकडे पाठफिरवली आहे.
तालुक्यातील शाळांमध्ये 34 हजार 436 असा हजेरी संख्या पट पहिल्या दिवशी राहिला आहे.
राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर तालुक्यातील पाटस, कुसेगाव, कानगाव, वासुंदे, हिंगणीगाडा आदी इयत्ता पाचवी ते बारावी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी पालकांच्या बैठका घेऊन पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत का, त्यांचे याबद्दल काय मत आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी चर्चा केली.
सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळेत पुर्ण तयारी करण्यात आली होती, मात्र अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थांची उपस्थिती कमी असल्याचे चित्र होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा सुरू झाली असल्याचे शासनांच्या नियमांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असणार आहेत.
विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेणे शिक्षकांबरोबर पालकांची ही जबाबदारी आहे. शाळेत येताना विद्यार्थांना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंगनुसार विद्यार्थांच्या बैठक व्यवस्था करण्याच्या सुचना विद्यालयांना दिल्या आहेत. अशी माहिती दौंड तालुका गटशिक्षण अधिकारी वणवे यांनी दिली.