माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २ – गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेकडो ग्रामस्थांना विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने मदत नव्हे; कर्तव्य समजून किराणा आणि भाजीपाला किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी अकल्पित मिळाल्यालेल्या मदतीने शेकडो ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले!!
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील साळुंगण येथे पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान झाल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते विक्रम खुटवड यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर प्रत्येक कुटुंबीयांना विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने किराणा आणि भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. गायकवाड, भोर तालुका सरचिटणीस सर्जेराव पडवळ, विक्रमदादा खुटवड युवामंचचे धनेश डिंबळे, सचिन सोंडकर, नथुराम गायकवाड, समीर धुमाळ, गणेश खुटवड, गणेश मालुसरे, माऊली राऊत, सागर गाडे, संकेत खुटवड, अमीर बाठे, राहुल गाडे, चंद्रकांत भोरडे, राजेंद्र गव्हाणे, गणेश गायकवाड, युवराज खुटवड, दत्तात्रय जाणकर, गुलाब गोळे, तुकाराम दुरकर, सखाराम दुरकर, शंकर दुरकर आदी उपस्थित होते.
विक्रम खुटवड म्हणाले की, जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे हाल झाले होते. मात्र प्रशासनाने सुद्धा वेळीच मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. ग्रामीण भागातील जनतेसाठी मदतीसाठी सदैव तत्पर राहू असे अशी विधायक ग्वाही त्यांनी दिली.
विक्रमदादा खुटवड युवामंचच्या वतीने तालुक्यात जवळपास ३० हजार मास्क वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी युवामंचचे धनेश डिंबळे व अमीर बाठे यांनी दिली. भोर ते साळुंगण बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विक्रम खुटवड यांनी पाठवुरावा करून बससेवा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी खुटवड यांचे आभार मानले.











