सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, तहसीलदार संजय पाटील यांचे आवाहन
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : धरणक्षेत्रात आजही पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातून गेलेल्या भीमा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. धोक्याची शक्यता नाही, मात्र तरीही पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तास अंत्यत महत्वाचे आहे. नदीलगतच्या गावांमधील नागरीकांनी आणि शेतकरांनी खबरदारी म्हणून आपल्या शेतात जाऊ नये, पाळीव जनावरे आणि आपल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन दौंडचे तहसीलदार संजय पाटील आणि निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी केले आहे.
धरण क्षेत्रात काल गुरूवार ( दि.22) पासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी खडकवासला धरण पुर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरल्याने गुरूवारी दुपारी धरणसाठ्यातील 1.75 TMC (88.52%) पाणीसाठ्याचा विसर्ग भिमा नदी पात्रात सोडण्यात आला होता. धरण क्षेत्रात जास्त प्रमाणात पाऊस झाला असून पुन्हा सायंकाळी 2466 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. परिणामी भिमा नदीचे पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहे.
आज शुक्रवारी (दि.23) धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम असल्याने सकाळी 62 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अद्यापही धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे केव्हाही नदीच्या पात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दौंड तालुक्यात सध्या पाऊस नसला तरी धरणक्षेत्रात मोठयाप्रमाणावर पाऊस पडत आहे.
यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून नदीच्या लगतच्या गावांमध्ये पुरजन्यपरिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. नदी लगतच्या गावांमधील आणि वाड्यावस्त्यांमधील नागरीकांनी आपल्या कुटुंबासहीत सुरक्षित ठिकाणी स्थालंतरीत व्हावे, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामाला जाऊ नये, नदीपात्राकडे कोणीही जाऊ नये, मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांनी मासेमारीसाठी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.
खबरदारी आणि दक्षता म्हणून नदीलगतच्या गावांमध्ये काय उपयायोजना कराव्यात यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या असून याबाबत नदीलगतच्या गावांमध्ये दंवडी देण्यात आली आहे.
नदीलगतच्या रहिवाशांमध्ये जर कोणाचे घर कच्च्या स्वरूपात असेल, तर त्यांनी स्थानिक तलाठी, ग्रामसेवक यांना तत्काळ संपर्क करून माहिती द्यावी, जेणेकरून पुढील अनर्थ टाळता येईल. मागील वर्षी राजेगाव परिसरात पाऊसाळ्यात ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात चार जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली होती.
अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरीकांनी ओढा, नाल्याच्या ठिकाणी पाऊस सुरू असताना जाऊ नये, नदीलगतच्या नागरीकांनी बंधारा किंवा पुलावरून प्रवास करू नये, वाहने येजा करू नये, कामाशिवाय प्रवास करणे टाळावे, शक्यतो नदीपात्रात लगत कोणीही फिरू नये, कोणतीही अनुसुचित घटना घडू नये यासाठी आपत्कालीन समिती लक्ष ठेवून असणार आहे. मात्र नागरीकांनी स्वतःआणि इतरांची काळजी घेण्यासाठी सतर्क राहावे,जागृत रहावे, असा प्रकार घडल्यास त्वरीत दौंड तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा असे आवाहनही तहसीलदार संजय पाटील यांनी केले आहे.