मुंबई : महान्यूज लाईव्ह
कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाराष्ट्राला २० मे पर्यंत कोरोनाची लस मिळणार नाही, १ मे पासून सुरू करण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने सर्व लस बुक केली आहे असा आरोप केला असून त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दाखला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने मुख्यमंत्र्यांना येत्या २० मे पर्यंत लस पुरवता येत नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राने मोठी मजल मारली आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लसीकरणासाठीही गर्दी वाढत आहे., अशा स्थितीत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
१ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना लस दिली जाणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात लशीची महाराष्ट्रालाही आवश्यकता आहे. मात्र लस उत्पादक कंपन्यांनी ५० टक्के लसीचे उत्पादन केंद्र सरकारसाठी राखीव ठेवले असून ५० टक्के लस ही राज्याला खरेदी खरेदी करावी लागणार आहे. मात्र मुळात २० मे पर्यंत आम्हाला लसच पुरवता येणार नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्टपणे सरकारला कळवले असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान सरकारने सीरम व भारत बायोटेक कंपन्यांना १२ कोटी लशीच्या डोसेसची मागणी केली