बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यात रेमीडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्ह्यामध्ये सध्याची मागणी 42 हजार इंजेक्शनची आहे, परंतु खाजगी दवाखाने सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने अधिक इंजेक्शनचा वापर करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले सध्या 42 हजार इंजेक्शन ची मागणी आहे. रेमडीसीवरचा पुरवठा रास्त हॉस्पिटलमध्ये करणार आहोत, परंतु मागणी आणि पुरवठा प्रमाण व्यस्त आहे.
केंद्र सरकारने रेमडीसीवरची निर्यात बंद केली, त्यामुळे दिल्लीतून पुणे जिल्ह्यात 3 हजार 500 इंजेक्शन मागवले, ते पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दवाखान्यांमध्ये वितरित करण्यात आली आहेत. हॉस्पिटलची मागणी लक्षात घेऊन पुरवठा केला जातो.मात्र स्टार्क फोर्सने दिलेल्या गाईडलाईन वापरूनच रेमडीसीवरचा वापर करावा. 100 टक्के रुग्णांना आता रेमडीसीवर दिली जातात. त्याची गरज नाही.
रेमेडीसीवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना कंपन्यांना केल्या आहेत. पुढच्या काही दिवसात पुरवठा सुरळीत होईल. रुग्ण रेमडीसीवीरची मागणी स्वतः करीत आहेत ते चुकीचे आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी जिल्ह्याला 75 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता, तोच आज 321 मेट्रिक टन लागत आहे. 100 टक्के ऑक्सिजन हा मेडिकल साठीच वापरला जात आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.